Marathi

  • Showing all 10 results

  • Filters
  • Filters
eBook

डॉ. निकोल टेस्ला

150.00

आपले आजचे जीवन अधिक सुखावह करणार्‍या आधुनिक तंत्रज्ञानाचा जर मागोवा काढला तर त्याचे मूळ, अलौकिक बुद्धीमत्तेचे शास्त्रज्ञ डॉ. निकोल टेस्ला यांच्या संशोधनात आणि त्यांनी लावलेल्या विविध शोधांमध्ये आहे. अभियंता, संशोधक, वैज्ञानिक, भौतिकशास्त्रज्ञ, क्रांतीकारी बदल घडवणारा, दूरदर्शी, भविष्यवादी ही बिरुदावली मानवजातीच्या विकासासाठी या महान वैज्ञानिकाने केलेल्या कार्याचे आणि योगदानाचे वर्णन करण्यास कमी पडेल.

डॉ. टेस्ला यांच्या नावे सुमारे ७०० हून अधिक संशोधनांचे पेटंट आहेत, त्या व्यतिरिक्त त्याांचच्या इतर अनेक शोधांचा उपयोग सामान्य माणसाला पण व्हावा या उद्देशाने त्यांनी त्या शोधांचे पेटंटही काढले नाही.

त्यांचे अनेक विस्मयकारक शोध व निष्कर्ष चूकीच्या हातामध्ये पडू नये या उद्देशाने त्यांनी ते जगासमोरच आणले नाहीत. जगात बदल घडवणार्‍या या त्यांच्या शोधांमध्ये अल्टरनेटिंग करंट (AC Current), पीस रे, ह्युमनॉइड रोबोट्स, टेलिव्हिजन (TV), रिमोट कंट्रोल, एक्स-रे, वायरलेस पॉवर ट्रान्समिशन, टाइम ट्रॅव्हल असे अनेक शोध आहेत. संपूर्ण जगाला फ्री इलेक्ट्रीसीटी देण्याची डॉ. टेस्ला यांची महत्वाकांक्षा होती. अलौकिक आणि सर्जनशील बुद्धीमत्ता लाभलेल्या या संशोधकाला विजेचे सामर्थ्य नियंत्रित करून त्याचा सुयोग्य वापर करण्याचे तंत्र उमगले होते, ज्यामुळे दुसर्‍या औद्योगिक क्रांतीचा पाया घातला गेला. म्हणूनच यांना इलेक्ट्रिक युगाचा शोधकर्ता म्हणून ओळखले जाते.

१८५६ मध्ये जन्मलेल्या सर्बियन अमेरिकन डॉ. टेस्ला यांनी बालपणापासूनच आपल्या विलक्षण बुद्धीमत्तेची आणि असाधारण क्षमतेची चूणुक दाखवली. त्यांची जडणघडण एका धार्मिक कुटुंबात झाली. त्यांचा परमेश्वरावर दृढ विश्वास होता. आणि ह्याच ठाम विश्वासामुळे घोर संकटातही ते कधीच डगमगले किंवा खचले नाहीत. त्यांची जीवनगाथा म्हणजे इतरांचा मत्सर, स्पर्धात्मक चढाओढी व नुकसानांनी ग्रासलेल्या यश व कष्टदायक प्रयासांची एक विलक्षण मालिकाच आहे. अभूतपूर्व यशाचे साक्षीदार असूनही केवळ पैसा कमावणे हे ध्येय त्यांचे कधीच नव्हते, त्याऐवजी डॉ. टेस्ला यांच्या संशोधानाची मदत घेऊन ज्या प्रभावी व प्रबळ व्यक्तींना त्यांच्या राक्षसी महत्वाकांक्षा व हेतू साध्य करायचे होते त्यांच्या दबावाखाली येण्यास डॉ. टेस्ला यांनी नकार दिला. तेव्हाच्या समकालीन व्यक्तींनी त्यांना सर्व प्रकारे नामोहरम करण्याचा प्रयत्न केला परंतू डॉ. टेस्ला यांच्या दुर्दम्य इच्छाशक्ती्पुढे ते हतबल झाले. अतुलनीय धैर्य आणि कधीही हार न मानणार्‍या वृत्तीमुळे डॉ. टेस्ला यांनी पुन्हा फिनीक्ससारखी भरारी घेतली व नंतर पुन्हा मागे वळून पाहिले नाही.

तथापि आपल्या काळाच्याही कित्येक शतकांनी पुढे असणार्‍या या द्रष्ट्र्या वैज्ञानिकाची प्रेरणादायक कहाणी काळाच्या ओघात विस्मृतीत जावी म्हणून जाणीवपूर्वक योग्य प्रकारे जगासमोर आणली गेली नाही. इ.स. २०१४ मध्ये, सदगुरु श्री अनिरुद्ध (डॉ. अनिरुद्ध जोशी – एम.डी. मेडिसिन, म्हणजेच अनिरुद्ध बापू) आपल्या प्रवचनात या नम्र परंतु महान व्यक्तिमत्त्वाबद्दल बोलले. त्यानंतर डॉ. निकोल टेस्ला यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्वाचा वेध घेणार्‍या लेखांची मालिका ‘दैनिक प्रत्यक्ष’ या मराठी वृत्तपत्रात प्रकाशित झाली. या पुस्तकाच्या अग्रलेखात डॉ. अनिरुद्ध जोशी लिहितात, “अनेकजण त्यांना‘ विज्ञानाचा ब्रह्मर्षि’ म्हणतात. जर तुम्ही मला विचारले, तर डॉ. निकोल टेस्ला हे जगाने जाणलेले या काळातले सर्वश्रेष्ठ वैज्ञानिक आहे. शिवाय, भविष्यात त्यांच्याएवढी तुल्यबळ व्यक्ती सापडणे हे अशक्य असेल.”

या पुस्तकाद्वारे डॉ. निकोल टेस्ला यांच्या जीवनाचा आणि कर्तृत्वाचा परिचय वाचकांना होईल. हे पुस्तक केवळ त्यांच्या विस्मयजनक शोधांवर आणि प्रयोगांवरच प्रकाश टाकत नाही तर आपले जीवन अखिल मानवजातीच्या उन्नतीसाठी समर्पित करणार्‍या डॉ. टेस्ला यांचे मानवी पैलू देखील परिचित करून देते. हे पुस्तक मूळत: ‘दैनिक प्रत्यक्ष’ या मराठी वृत्तपत्रात प्रकाशित झालेल्या लेखांचे संकलन आहे. वाचकांच्या सोयीसाठी या पुस्तकातील लेखांचे भाषांतर आणि पुनर्प्रकाशन करण्यात आले आहे.

Continue reading....
 

eBook

आधुनिक इतिहासाचे मानबिंदू भाग १ – मराठी

180.00

आधुनिक इतिहासाचे मानबिंदू
ऐकल्याशिवाय बोलता येत नाही. यश जाणल्याशिवाय यशस्वी होता येत नाही.
प्रत्येक क्षेत्रातील यशस्वी उत्तुंग व्यक्तिमत्त्वे जवळून बघण्यासाठी व जाणण्यासाठी… येत आहे – दैनिक ’प्रत्यक्ष’
दैनिक प्रत्यक्षचा पहिला अंक प्रकाशीत होण्याअगोदर या बिगर राजकीय वर्तमानपत्राविषयी त्या वेळेच्या आघाडीच्या मराठी वर्तमानपत्रांमध्ये प्रत्यक्षविषयी एक जाहिरात छापून आली होती. त्यातील वरिल वाक्यांनी वाचकांच्या मनात कुतुहल निर्माण केले होते.
कला असो की क्रीडा, साहित्य असो की व्यवसाय अशा नानाविध क्षेत्रात प्रदीर्घ काळाचा इतिहास अनुभवलेल्या व्यक्ती आपल्यात वावरत असतात. या व्यक्तींच्या इतिहासातील आठवणी, त्यांचा अनुभव पुढच्या पिढीला मिळावा म्हणून ’चालता बोलता इतिहास’ या सदराचे प्रयोजन केले होते. ’आधुनिक इतिहासाचे मानबिंदू’ हे पुस्तक म्हणजे ’दैनिक प्रत्यक्ष’ मधील ’चालता बोलता इतिहास’ या सदरातील लेखमालांचे सुंदर कोलाज्‌. हे पुस्तक दोन भागात प्रकाशीत झाले. व त्यात पुढील मान्यवरांवर लिहिलेल्या लेखमालेतील लेख होते.

’आधुनिक इतिहासाचे मानबिंदू’ – भाग १
संगीतकार प्यारेलाल – वर्षानुवर्षे अप्रतिम संगीताचा नजराणा देणार्‍या लक्ष्मीकांत-प्यारेलाल जोडगोळीपैकी प्यारेलाल
जयमाला शिलेदार – संगीत रंगभूमीचा इतिहास अनुभवलेल्या, संगीत रंगभूमीवर इतिहास घडविलेल्या जयमालाबाई म्हणजेच नाट्यसंगीताची साचार तपस्विनी
सलीम खान सलीम-जावेद हे हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये कथा-पटकथा-संवाद लेखक म्हणून आघाडीचे नाव. यातील सलीम खान म्हणजे इतिहासाची जाण आणि वर्तमानकाळाचं भान राखणारे एक संवेदनशील व्यक्तिमत्व.
अमीन सयानी – नादमधुर शब्दफेक व लयकारी भाषेचा गोडवा लाभलेले आकाशवाणी (रेडियो) क्षेत्रातील उत्तुंग व्यक्तिमत्व म्हणजे अमीन सयानी. ’बिनाका गीतमाला’ (Link) या अजरामर कार्यक्रमामुळे हे नाव भारतातील घराघरात पोहोचले आहे.
आशालता वाबगांवकर – मराठी रंगभूमी आणि हिंदी-मराठी चित्रपट चित्रपटसृष्टीतील अनेकविध भूमिका आपल्या अभिनयने जीवंत करणार्‍या जेष्ठ अभिनेत्री आशालता वाबगांवकर.
पंढरीनाथ जुकर – हिंदी व मराठी चित्रपटसृष्टीमधील मेकअप मन’. दिलीपकुमार ते शाहरुख खानमीनाकुमारी (Link) ते माधुरी दिक्षीत अशा अनेक सिनेनटनट्यांचे मेकअप मन

Continue reading....
eBook

आधुनिक इतिहासाचे मानबिंदू भाग २ – मराठी

180.00

`आधुनिक इतिहासाचे मानबिंदू’ – भाग २

मुरलीधर शिंगोटे – वृत्तपत्र विक्रेतापासून वितरक आणि वितरकांपासून वृत्तपत्रांच्या समूहाची मालकी हा जीवनप्रवास
बाळासाहेब विखे-पाटील – सहकारक्षेत्रातील प्रभावी आणि आदरणीय अधिकारी व्यक्तिमत्व
अनिल फडके – मनोरमा प्रकाशनाचे मालक. वाचकांची नस ओळखणार्‍या फडके यांचा प्रकाशन व्यवसायातला अनुभव खर्‍या अर्थाने बोलका, आपल्याला अंतर्मुख करणारा आणि त्याचवेळी आपली उमेद वाढविणारा आहे.


प्रभाकर देवधर – देशातील उद्योगक्षेत्राला फार मोठे योगदान देणार्‍या देवधर यांनी १९८२ ते ९१ या काळात राजीव गांधी यांचे ’इलेक्ट्रॉनिक्स’ क्षेत्राचे सल्लागार म्हणून काम पाहिले. महत्वाच्या सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांचे प्रमुख (अ‍ॅपलॅब ग्रुप ऑफ कंपनीज्‌) म्हणून देवधर यांनी प्रचंड कर्तृत्त्व गाजविले.
मृणाल गोरे – पाणीवाली बाई म्हणून जनसामांन्यांमध्ये परिचीत. लोकांच्या प्रश्नांसाठी समाजकारणात, राजकारणात उतरलेल्या समाजवादी ध्येयवादाचे संस्कार असलेल्या पिढीच्या त्या प्रतिनिधी आहेत.
अशा या व्यक्तिमत्त्वांची एकत्र भेट घेण्याची संधी वाचकांना या पुस्तकाच्या माध्यमातून मिळत आहे. मात्र ही पुस्तके वाचकांसमोर आणताना एक गोष्ट आवर्जुन सांगायला हवी. काही वर्षांपूर्वी प्रकाशित झालेल्या या लेखमाला विशेष बदल न करता, त्याच स्वरुपात वाचकांसमोर मांडण्यात आल्या आहेत. यातले स्थळकाळाचे संदर्भही तसेच ठेवण्यात आले आहेत. सुजाण वाचक याची नक्कीच नोंद घेतील.

Continue reading....

Book
eBook

मी पाहिलेला बापू – मराठी

250.00

सद्गुरु श्री अनिरुद्ध बापू म्हणजे विविधांगी व वैशिष्ट्यपूर्ण पैलूंनी भरलेले एक अद्वितीय व्यक्तिमत्व! ह्या असाधारण व्यक्तिमत्वाचा वेध घेण्याचा एक प्रयास म्हणून, ‘दैनिक प्रत्यक्ष’चे सन २०१२ व २०१३ चे ‘नववर्ष विशेषांक’ ‘मी पाहिलेला बापू’ ह्या विषयाला वाहिलेले होते. बापूंच्या शालेय जीवनापासून ते वैद्यकीय प्रॅक्टिसच्या काळात अनेकविध लोकांना त्यांचे सान्निध्य लाभले. अशा, बापूंच्या सान्निध्यात आलेल्या अनेकविध लोकांच्या, अनिरुद्धांच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू दाखविणाऱ्या, त्या काळातील आठवणी त्यांमध्ये शब्दांकित करण्यात आल्या होत्या. त्याचबरोबर काही मोजक्या व्यक्तिमत्वांच्या, अलिकडील काळातील आठवणींचाही त्यात समावेश करण्यात आला होता. बापूंच्या आगळ्यावेगळ्या व्यक्तिमत्वावर प्रकाश टाकणारे ‘दैनिक प्रत्यक्ष’चे हे दोन्ही अंक अविस्मरणीय असेच ठरले होते.

ह्या सर्व लेखांचे संकलन असलेले, “मी पाहिलेला बापू” हे पुस्तक २०१७मध्ये गुरुपौर्णिमेच्या मंगल दिनी प्रथम मराठी व हिंदी ह्या दोन भाषांमध्ये प्रकाशित करण्यात आले. त्यानंतर अल्पावधीतच इंग्रजी भाषेतील पुस्तकही प्रकाशित झाले.

Book
eBook

आपत्कालीन व्यवस्थापन – मराठी

250.00

अनेक आपत्तींची टांगती तलवार सातत्याने मानवाच्या डोक्यावर आहे. नैसर्गिक आपत्ती  उदा. भूकंप , वादळे, पूर , भूस्खलन , दुष्काळ  इ. चे आघात होतच असतात. मानवनिर्मीत आपत्ती उदा. मोठे अपघात , रासायनिक, जैविक व आण्विक  युद्धे यातही जग होरपळून निघतच आहे. या सर्व आपत्तींमुळे जीवितहानी, आर्थिक व सामाजिक नुकसान होते, तसेच पर्यावरणावरही त्यांचा विपरीत परिणाम होतो.

या सर्व पार्श्वभूमीवर आपत्कालीन व्यवस्थापनाचे महत्व ही आज राष्ट्रांची प्राथमिक गरज झाली आहे. ह्याची गरज जशी सरकारला आहे, तशीच, किंबहुना त्याहीपेक्षा अधिक देशातील नागरिकांना. कारण, कोणत्याही आपत्तीत सर्वसामान्य नागरिकच होरपळून निघतात. यासाठी आपत्कालीन व्यवस्थ्यापनात नागरिकांचा थेट सहभाग आवश्यक आहे. 

ऑगस्ट २००१ मध्ये डॉ. अनिरुद्ध धैर्यधर जोशी, एम. डी. (मेडिसिन)  ह्यांनी बदलत्या काळाची पावले ओळखून ’डिसास्टर मॅनेजमेंट अ‍ॅकॅडमी’ची संकल्पना मांडली व त्यानुसार त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनिरुद्धाज्‌ अ‍ॅकॅडमी ऑफ डिसास्टर मॅनेजमेंट ची स्थापना झाली. ही अ‍ॅकॅडमी स्थापन होताच प्रथम प्राधान्य दिले गेले, ते संपूर्ण, सर्वसामावेशक अशा स्वरूपातील ’डिसास्टर मॅनेजमेंट’ अर्थात ’आपत्तीनिवारण’ ह्या विषयावरील पुस्तक तयार करण्याला. ह्या पुस्तकाच्या आधारे आजमितीस (म्हणजेच जुलै २०२१ पर्यंत) आपल्या देशातील जवळपास ८४,००० हजारापेक्षाही अधिक नागरिकांना ह्या विषयाचे विनामूल्य प्रशिक्षण देण्यात आले आहे. शालेय व महाविद्यालयीन अभ्यासक्रमामध्येही हा विषय आता समाविष्ट केला गेला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना ह्या पुस्तकाचा नक्कीच उपयोग होईल.

आपल्या देशातील प्रत्येक व्यक्तीला, मग ती कुठल्याही  जाती, धर्माची असो, तीला नैसर्गिक वा मानवनिर्मित आपत्ती व्यवस्थापनात सज्ज करणे हे अनिरुद्धाज्‌ अ‍ॅकाडेमी ऑफ डिसास्टर मॅनेजमेंट चे ध्येय आहे. आपत्ती व्यवस्थापनाचे सर्वसमावेशक प्रशिक्षण प्रत्येक नागरिकाने घेणे ही काळाची गरज आहे. प्रशिक्षणार्थींना वैद्यकीय मदत येईपर्यंत बचाव पद्धती , प्राथमिक प्रथमोपचार, कार्डिओ पल्मनरी सेरेब्रल रीसिसिटेशन (सीपीसीआर) मध्ये तयार करणे आणि सुसज्ज करणे हे महत्वाचे कार्य आहे. यामुळे आपत्तीच्या कारणाने होणारे नुकसान कमी होते तसेच जखमी व्यक्तिंचा जीव वाचविण्यामध्येही मदत होते. हे पुस्तक यासाठी नक्कीच मार्गदर्शक ठरेल.

ह्या पुस्तकाची शैली अत्यंत सहज व सोपी असून ह्यात आपत्तीचे प्रकार, आपत्तींना देण्यात येणारा प्रतिसाद, प्रतिबंधक उपाय अशा अनेकविध विषयांचा समावेश आहे. तसेच या पुस्तकात काळाला अनुरुप बदलही करण्यात आले आहेत. ह्या पुस्तकातील मार्गदर्शन, माहिती व सूचना यांचे योग्य प्रकारे पालन केल्याने योग्य प्रकारे आपत्तीच्या घडीला समर्थपणे सामोरे जाता येईल, ही मात्र निश्चित गोष्ट आहे.

Continue reading....

Book
eBook

तिसरे महायुद्ध – मराठी

250.00
ह्या पुस्तका विषय केवळ दहशतवाद वा दहशतवादविरोधी युद्धा हा नसून, पुढील काळात उलगडत जाणार्‍या जागतिक घडामोडींच्या शक्यतांचा विचार आतापर्यंत घडलेल्या घटनांच्या अभ्यासाच्या आधारे करणे हा आहे. संघर्ष हाच पुढील जवळजवळ वीस ते पंचवीस वर्षांसाठी पृथ्वीच्या पाठीवर प्रत्येक ठिकाणी दैनंदिन व्यवहार होणार आहे.
हे भविष्यकथन नव्हे. हा अभ्यास आहे इतिहासाचा आणि सद्य: स्थितीचा आणि हे संशोधन आहे, जागतिक रंगमंचावरील पात्रांच्या मनोगतांचे. पुढे येणार्‍या वीस वर्षात अक्षरश: शेकडो ठिकाणी हजारो घटना घडणार आहेत तर येथे फक्त मोजक्या दहांचाच प्रातिनिधिक उल्लेख आहे. त्यामुळेच इतर नव्वद घटनांची नोंद केलेली नाही एवढेच, पण त्यांचा अंतर्भाव अभ्यासात नक्कीच झालेला आहे.
दरवर्षी कॅलेंडर (दिनदर्शिका) निघते, कारण त्यामागे एक निश्चित स्वरूपाचे गणिती सूत्र आणि रचना असते परंतु ह्या येणार्‍या ‘तिसर्‍या महायुद्धाचे कॅलेंडर मात्र दररोज नवीन असेल. सर्वसामान्य माणसाला ह्या तिसर्‍या महायुद्धाची निदान २% तरी ओळख व्हावी, म्हणून केलेला हा लेखनप्रपंच.
eBook

इस्रायल एक प्रदीर्घ प्रवास – पण यशस्वी! – मराठी

250.00

“इस्रायल – एक प्रदीर्घ प्रवास, पण यशस्वी” हे पुस्तक वाचकाला इस्रायल ह्या राष्ट्राच्या विविध पैलूंची सखोल माहिती करून देते. इस्रायलने आज जागतिक रंगमंचावर महत्त्वपूर्ण स्थान पटकावलेले आहे आणि इस्रायल भारताबरोबर आपली आगळीवेगळी मैत्री राखून आहे. ज्याला ज्याला म्हणून ह्या सगळ्याचा विशाल दृष्टिकोनातून अभ्यास करायचा आहे, त्याने तर हे पुस्तक नक्कीच वाचले पाहिजे. ह्या पुस्तकाच्या लेखिका ‘शुलमिथ पेणकर-निगरेकर’ ह्या एक भारतीय-इस्रायली महिला असून, सध्या त्यांचे वास्तव्य तेल अवीव्ह येथे आहे.

हे पुस्तक इस्रायलच्या स्फूर्तिदायक इतिहासावर तर प्रकाश टाकतेच; त्याचबरोबर इस्रायलच्या धार्मिक परंपरा, समाजजीवन, चाकोरीबाहेर विचार करत कल्पनेपलीकडच्या गोष्टी साध्य करणारी इस्रायलची नाविन्यपूर्णता, इस्रायलचे सेनादल, अर्थकारण, आंतरराष्ट्रीय संबंध, मुख्य म्हणजे ह्या सगळ्याचा उपयोग करून, आत्यंतिक प्रतिकूल परिस्थितीतही इस्रायलने केलेली नेत्रदीपक प्रगती ह्या सर्वांशीही वाचकाचा परिचय करून देते. ज्यूधर्मियांचा आद्यपूर्वज अब्राहम आणि ‘होली लँड’संबंधी त्याला झालेला ईश्वराचा दृष्टांत, ह्या ज्यूधर्मामध्ये मान्यता असलेल्या कथेपासून हे पुस्तक सुरू होते. त्यानंतरच्या सर्व कालखंडातील ज्यूधर्मियांच्या इतिहासाचा वेध घेत-घेत ‘झायोनिझम्’च्या उदयाच्या कालखंडाकडे येऊन पोहोचते; व त्यानंतर इस्रायलचे स्वातंत्र्य आणि स्वातंत्र्यानंतरही इस्रायलला लढावी लागलेली महत्त्वाची युद्धे आणि इस्रायलने साधलेली प्रगती ह्यांवर प्रकाश टाकते.

ह्या पुस्तकाचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी, डॉ. अनिरुद्ध धैर्यधर जोशी ह्यांनी लिहिलेल्या, ह्या पुस्तकाच्या प्रस्तावनेतील हा एक परिच्छेद समर्पक ठरावा – “भविष्यकाळात सर्व जगभरात जो युद्धाचा, वैमनस्याचा व मानवनिर्मित नैसर्गिक आपत्तींचा भडका उडणार आहे व जो हळूहळू जगभर पसरू शकतो, त्या सर्वांशी मुकाबला करण्याचे सामर्थ्य, इस्रायल व भारत घट्टपणे एकत्रित राहिल्यास नक्कीच तयार होऊ शकेल; व ह्या दोन देशांच्या हातांना जपान, अमेरिका आणि रशिया ह्यांचे हात येऊन मिळाले, तर होणारा विध्वंस बऱ्याच अंशी टाळता येईल.

Continue reading....

Book
eBook

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ – मराठी

275.00

‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ’ १९२५ साली स्थापन झाला. डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी रोवलेल्या या बीजाचे आता विशाल वटवृक्षात रूपांतर झाले आहे. या वटवृक्षाच्या शाखा किती, पाने किती याची मोजदाद करणे अवघड आहे. पण ही संघटना भारतीय जनमानसात खूप खोलवर आपली मुळे रोवून समर्थपणे उभी आहे आणि वटवृक्षाच्याच गती आणि शैलीने विकास करीत आहे. बालपणापासून संघाशी जोडले गेलेले आणि सारे जीवन संघाला वाहिलेले ‘रमेशभाई मेहता’ यांनी संघाचा इतिहास दैनिक प्रत्यक्ष मध्ये लेखमालेच्या स्वरुपात आपल्यासमोर मांडला. संघासाठी आणि संघाच्या मार्फत समाजासाठी, संस्कृतीसाठी, मातृधर्माच्या अभ्युदयासाठी प्रयत्न करणारे रमेशभाई म्हणजे केवळ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचाच नाही, तर स्वातंत्र्योत्तर काळातील अनेक महत्त्वाच्या घडामोडींचा ‘चालता बोलता इतिहास’च आहेत. स्वातंत्र्यपूर्व काळात संपन्न कुटुंबात जन्म झालेल्या रमेशभाईनी बालपणी संघाच्या शाखेत पाऊल ठेवले; आणि त्यानंतर त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक पाऊल संघाच्या निर्देशानेच पडत राहिले आणि आजही त्यांची ही वाटचाल सुरू आहे.

अनेक राजकीय पक्ष हे सुरुवातीपासूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघांच्या विचारसरणीला विरोध करत आलेले आहेत. इंग्रजांच्या राजवटीत तसेच १९४८ साली, आणीबाणीच्या काळात (१९७५-१९७७) आणि १९९२ साली अयोध्या प्रकरणानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर काही काळ बंदीही घालण्यात आली होती. जनसामान्य मात्र संघाबाबतच्या दोन मतप्रवाहामुळे चकित होत असतात. एकीकडे संघाशी जोडला गेलेला विशाल जनसमुदाय, तर दुसरीकडे संघावर तुटून पडणारी, संघाच्या विचारधारेवर जहाल टीका करणारी मंडळी, असे चित्र सर्वसामान्य भारतीय गेली अनेक दशके पाहत आहे. म्हणूनच संघाचे विचार, संघाने दिलेल्या योगदानाची माहिती आणि ह्याचे महत्त्व तटस्थपणे समजून घेणे अधिक श्रेयस्कर ठरेल. कुणाचे विचार स्वीकारायचे किंवा नाकारायचे, याचे स्वातंत्र्य प्रत्येकाला असतेच. पण विचार स्वीकारण्याच्या अथवा नाकारण्याच्या आधी, ते विचार नीट समजून घेण्याची प्रक्रिया प्रगल्भ मंडळी कधीही टाळत नाहीत आणि ‘संवाद’हा या प्रक्रियेचा सर्वात महत्त्वाचा भाग ठरतो. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाबतीतला हाच संवाद म्हणजे ‘दैनिक प्रत्यक्ष’ची मध्ये आलेली लेखमाला – ‘चालता बोलता इतिहास’!

या मराठी लेखमालेचे हिंदी. इंग्रजी व गुजराती भाषांमध्येही भाषांतर झाले व ते पुस्तक रूपाने प्रसिध्दही झाले. या चारही भांषेंमधील पुस्तकांचा अनावरण सोहळा उत्तर प्रदेश चे माननीय राज्यपाल श्री. राम नाईक, केंद्रीय वाहतूक मंत्री श्री. नितीन गडकरी, राज्यसभा सदस्य व एस्सेल ग्रुप उद्योग समूहाचे प्रमुख डॉ. सुभाष चंद्रा यांच्या हस्ते दि. २९ एप्रिल २०१७ रोजी पार पडला.

रमेशभाई मेहता यांनी सर्वसामान्यास अपरिचीत असणार्‍या आपल्या देशाचा इतिहासाबरोबरच १९२५ पासून १९९६ पर्यंतचा संघाचा प्रवास या पुस्तकात  मांडलेला आहे. डॉ. हेगडेवारांनी संघाची स्थापना केल्यापासूनची वाटचाल, त्यामागची प्रेरणा, द्वितीय सरसंघचालक श्री. गोळवलकर गुरुजी आणि तृतीय सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांच्यापर्यंतची माहिती या पुस्तकात सामाविष्ट करण्यात आली आहे. तसेच विविध समाज घटकांना (उदा. महिला, विद्यार्थी, वनवासी, कामगार इ.) एकत्र बांधण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अनेक संघटनांची स्थापना केली याचीही माहिती या पुस्तकात मिळते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दल समाजात असलेले अनेक समज – गैरसमज यावर हे पुस्तक प्रकाश टाकेल अशी आशा वाटते.

Continue reading....

Book
eBook

गर्द सभोवती – मराठी

350.00

प्रत्येक माणसाच्या जीवनात अनेक व्यक्ती येतात, प्रत्येकाचे स्वभाव वेगळे असतात. काही व्यक्ती मनाच्या खोल खोल कप्प्यात कुठेतरी जाऊन बसतात. बालपणीच्या काही घटना मनात घर करून राहतात. निर्सगाचेही विविध पैलू आपण आपल्या मनात साठवत असतो. अशा अनेक चांगल्या आठवणींची शिदोरी प्रत्येकाकडे असते. आशालता वाबगावकर यांनीही आपल्या जीवनप्रवासातील आठवणींच्या साठवणी लेखमालेच्या स्वरूपात ’दैनिक प्रत्यक्ष’ या बिगर राजकिय वर्तमानपत्रात लिहिल्या व या लेखमाला ’गर्द सभोवती’या पुस्तकात सामाविष्ट करून दि. २६ जून २०१७ रोजी सचिन खेडेकर यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन झाले.

          संगीत नाट्यसृष्टीत व चित्रपट क्षेत्रात आपल्या कसदार अभिनयाचा ठसा उमटविणार्‍या चतुरस्त्र अभिनेत्री म्हणून आशालता वाबगावकर या रसिकांना परिचीत आहेतच. आशालता यांचा जन्म मुंबईचा. गिरगावातील ‘सेंट कोलंबो हायस्कूल’मधून त्यांनी शालेय शिक्षण पूर्ण केले. तेव्हाच्या अकरावी मॅट्रिकनंतर त्यांनी काही काळ मंत्रालयात नोकरीही केली. त्याच वेळी नोकरी सांभाळून कला शाखेतून पदवी आणि पदव्युत्तर शिक्षणही पूर्ण केले. ‘श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी’ (एसएनडीटी) महिला विद्यापीठातून त्यांनी ‘मानसशास्त्र’ विषयात ‘एम.ए.’ केले.

          आशालता ह्यांनी विविध भाषांतील शंभरहून अधिक चित्रपटांमध्ये अभिनय केला. ‘दि गोवा हिंदू असोसिएशन’ या संस्थेने महाराष्ट्र राज्य नाट्यस्पर्धेत सादर केलेल्या ‘संगीत संशयकल्लोळ’या नाटकातील रेवतीच्या भूमिकेतून आशालता वाबगावकर यांनी रंगभूमीवर पदार्पण केले. पुढे ‘चंद्रलेखा , ‘मुंबई मराठी साहित्य संघ’, ‘माऊली प्रॉडक्शन’, ‘कलामंदिर’, ‘आयएनटी’ आदी नाटय़संस्थांमधून  त्यांनी  नाटकांचे  प्रयोग केले. ‘मत्स्यगंधा’ या  संगीत  नाटकातील  त्यांची  भूमिका  प्रचंड  गाजली.

          अभिनयात सक्रिय असतानाच त्यांनी गायनाची आवडही जोपासली. पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्याकडे त्यांनी शास्त्रीय संगीताचे धडे गिरवले होते. आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावर त्यांनी काही कोंकणी गाणीही गायली आहेत, तसेच कल्याणजी-आनंदजी यांच्या वाद्यवृंदामध्येही काही काळ गाणी गायली आहेत.

          प्रसिद्ध मराठी अभिनेते सुबोध भावे यांनी या पुस्तकाची प्रस्तावना लिहिली आहे. यात ते म्हणतात, “या लिखाणात मला संवेदनशील मनाचं व्यक्तीचं प्रतिबिंब जाणवत आहे. आजूबाजूच्या दुलर्क्षित केलेल्या घटनांकडे बघून… त्यांचा अंदाज बांधून त्यावर स्वतःचे विचार व्यक्त करणं, हे मला वाटतं आशाताईंमधल्या संवेदनशील माणसाची अन्‌ कलाकाराची ओळख आहे. किती वैविध्यपूर्ण लिखाण त्यांनी या सदरात केलं आहे. अनेक गोष्टींना वेगळ्या नजरेने… वेगळ्या दृष्टिकोनातून पाहण्याचा अंदाज हा आपल्याला स्पर्शून जातो. बऱ्याचवेळा कलाकार ज्यावेळी स्तंभलेखन करतो वा सदरात लिखाण करतो, त्यावेळी तो त्याच्या कामाविषयी चित्रपट, नाटक वा मालिका यांच्या सहभागाविषयी लिहितो. आशाताईंनी रोजच्या जगण्यातील कितीतरी संदर्भ इतक्या संवेदनशील पद्धतीने या लिखाणात मांडले आहेत की, ते वाचून थक्क व्हायला होतं. हे लिखाण त्यांच्या नावाप्रमाणेच आशादायी आहे. हे लिखाण प्रफुल्लित करणारं आहे.”

Continue reading....
Book
eBook

गुन्हेगारांचे कर्दनकाळ न्यायवैद्यक शास्‍त्र – मराठी

350.00

गुन्हेगारांचे कर्दनकाळ – न्यायवैद्यक शास्त्र– डॉ. वसुधा आपटे

आता अनेक चित्रपट व टि.व्ही. सिरीयल्स मुळे फोरेन्सिक सायन्स (न्यायवैद्यक शास्त्र) ही संकल्पना अनेकांना परिचीत आहे. एखादा गुन्हा घडल्यानंतर त्या गुन्ह्याचा फोरेन्सिक रिपोर्ट  गुन्हेगाराला पकडून देण्यास व त्याला कोर्टात योग्य ती शिक्षा देण्यास महत्वाची भूमिका बजावतो. न्यायवैद्यक शास्त्र ह्याबाबत सामान्य माणसांना जरी प्रचंड उत्सुकता असली तरी त्यातील फारच थोडी माहिती असते. डॉ. वसुधा आपटे ह्या न्यायवैद्यक शास्त्रातील प्राध्यापिका व तज्ज्ञ आहेत. अनेक किचकट व अवघड वाटणार्‍या प्रकरणांमध्ये त्यांनी न्यायालयास मदत केली आहे. 

जे ज्ञान त्या वैद्यकीय विद्यार्थ्यांना देत असत किंवा न्यायालयात त्या ज्ञानाच्या आधारे साक्ष देत असत, ते सर्व ज्ञान अतिशय साध्यासोप्या व सर्वसामान्यांना समजेल अशा भाषेत यावे म्हणून ’दैनिक प्रत्यक्ष’ मध्ये त्यांनी या विषयावर लेखमाला लिहीली. या लेखमालेतील लेखांचे इंग्रजीमध्येही भाषांतर केले गेले, व दि. २६ जून २०१७ रोजी निवृत्त पोलिस महासंचालक श्री. प्रवीण दिक्षित  यांच्या उपस्थितीत या सर्व लेखांचे मराठी व इंग्रजी पुस्तकाच्या स्वरुपात प्रकाशन झाले. न्यायवैद्यक शास्त्र ह्या विषयावर इंग्रजीत अनेक पुस्तके आहेत परंतु मराठीमध्ये मात्र ह्या प्रकारचे हे पहिलेच पुस्तक आहे.

आपल्या पणजी रमाबाई रानडे यांचा वारसा पुढे नेणार्‍या डॉ. वसुधा आपटे ह्या सुमारे ३५ वर्ष एवढा प्रदीर्घ अनुभव असलेल्या महाराष्ट्रातील एकमेव महिला न्यायवैद्यकतज्ञ आहेत. आपले एम.बी.बी.एस. पूर्ण झाल्यावर ह्यांनी लग्नानंतर एम.डी. व एल.एल.बी. ची पदवी मिळवली. डॉ. वसुधा आपटे या नायर हॉस्पीटल  व सूरत येतील ’इस्टिट्यूट ऑफ मेडिकल एज्युकेशन अ‍ॅंड रिसर्च’ येथे ’फोरेन्सिक मेडिसीन आणि टॉक्सिकॉलॉजी’ विभागाच्या प्रमुख तसेच नायरसंलग्न टोपीवाला वैद्यकीय महाविद्यालय येथे प्राध्यापिका म्हणून कार्यरत होत्या.

या पुस्तकाची प्रस्तावना निवृत्त पोलिस महासंचालक श्री. प्रवीण दिक्षित यांनी लिहीली आहे. यात ते लिहितात, “जरी हे पुस्तक डॉ. वसुधा आपटे यांनी सर्वसामान्यांसाठी लिहिलेले असले तरी तपासासाठी अत्यंत उपयोगी असल्याने ते सर्व पोलीस अधिकारी, कर्मचारी यांनी आपल्या तपासातील त्रुटी कमी करण्यासाठी’कोश’ म्हणून वापरावे इतके उत्कृष्ट आहे. ह्या पुस्तकामध्ये जवळ जवळ १३० विविध विषयांचा ऊहापोह, सर्व शास्त्रीय माहिती देऊन, ती अतिशय रोचक पध्दतीने वाचकांसमोर आणलेली आहे. न्यायवैद्यक शास्त्राच्या मदतीने एखाद्या व्यक्तीचा त्या गुन्ह्याशी संबंध सिद्ध झाल्यानंतर त्या व्यक्तीस शिक्षा होते, तेव्हा ती निर्विवाद असते. गुन्ह्याचा तपास हा शास्त्रोक्त पद्धतीने करायचा असल्यास, ते फक्त न्यायवैद्यक शास्त्राचा अभ्यास करण्यानेच शक्य आहे. ज्या गुन्ह्यात कोणीही माहिती देत नाही व बर्‍याच वेळेला पीडित व्यक्ती मृत असते आणि जर हे गुन्हे विशेषतः कुटुंबांतर्गत असतील तर ते फक्त न्यायवैद्यक शास्त्रामुळेच उघडकीस येऊ शकतात.”

हे पुस्तक प्रकाशीत झाल्यापासून आतापर्यंत संबंधित कायद्यांमध्ये बदल झाले आहेत, संशोधनामुळे नविन माहिती उपलब्ध झाली आहे. निदानतंत्र व उपाचारातही बदल झाले आहेत, तरीही न्यायवैद्यक शास्त्र या विषयाबद्द्ल समाजात असलेले अनेक समज – गैरसमज यावर हे पुस्तक प्रकाश टाकेल व अनेकांना मार्गदर्शक ठरेल याची खात्री वाटते. 

Continue reading....